Description
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तीना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायम स्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे. तसेच शासन निर्णय क्र.मग्रारो-२०१६/प्र.क्र.६१/मग्रारो-१,दि.१२/०४/२०१८ व शासन निर्णय क्र.मग्रारो- २०११/प्र.क्र.१२०/रोहयो-१०अ, दि.१४/०३/२०१२ अन्वये वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतक-याच्या शेत जमिनीवर फळबाग / वृक्ष लागवड कार्यक्रम राबविनेबाबत मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने या योजने अंतर्गत फळबाग / वृक्षलागवड करू शकता.
१) लाभार्थीची पात्रता
(ज्या प्रवर्ग पात्रता आहे त्या प्रवर्गाचे संबधित कागदपत्रे सोबत जोडावीत.)
१) अनुसूचित जाती
२) अनुसूचित जमाती
३) भटक्य जमाती
४) भटक्या विमुक्त जमाती
५) दारिद्य्र रेषेखालील इतर कुटुंब
६) महिलाप्रधान कुटुंब
७) शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब
८) भूसुधार योजनेचे लाभार्थी
९) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
१०) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी
(वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती
११) कृषी कर्जमाफी २००८ नुसार अल्प भुधारक ( १ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर (५एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ) व सीमांत शेतकरी (१ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक/कुळ)
2) कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉबकाई असणे आवश्यक
3) लाभार्थीच्या नावे जमीन / जागा असणे आवश्यक आहे.
(असल्यास सोबत ७/१२, ८ अ उत्तारा (तीन महिने आतील) साक्षांकित सत्य प्रत )
4) लाभार्थी सदर गावाचा रहिवाशी असल्याबाबत रहिवासी स्वयंघोषणापत्र
5) लाभार्थी आधार कार्ड झेरोक्स प्रत
6) लाभार्थी चे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरोक्स प्रत
7) सदरचे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट मध्ये समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार शिफारस पत्र.
8) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत वैयक्तिक क्षेत्रावर फळबाग लागवड / वृक्षलागवड योजना राबविण्यास लाभार्थी समंतीपत्र जोडणे.

Reviews
There are no reviews yet.